किसान क्रेडिट
कार्ड म्हणजे काय?
किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच केसीसी
ही एक योजना आहे, जिचा उद्देश शेतकऱ्यांना शेतीसंबंधीच्या
कामासाठी आर्थिक मदत करणं हा आहे. केसीसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बी-बियाणे, खतं, कीटकनाशकं
इ. शेतीच्या कामांसाठी कर्ज दिलं जातं.
केसीसीसाठी सगळेच शेतकरी अर्ज करू
शकतात. यामध्ये स्वत:च्या मालकीची जमीन असणारे, इतरांची
जमीन भाडेतत्वावर करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश होतो.
याशिवाय 2018-19च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान पशुपालन (शेळीपालन, मेंढीपालन
कुक्कुटपालन इ.) आणि मत्स्यपालन (animal husbandry and fisheries) करणाऱ्या
शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ देण्याचं निश्चित करण्यात आलं.
KCC साठी
अर्ज कसा करायचा?
फेब्रुवारी 2019मध्ये
भारत सरकारनं एक परिपत्रक काढलं. त्यानुसार देशात 6.95 कोटी शेतकरी
केसीसी वापरत असल्याचं सांगण्यात आलं. असं असलं तरी मोठ्या प्रमाणावर शेतकरी
केसीसी आणि पर्यायी त्याद्वारे मिळणाऱ्या कृषी कर्जापासून वंचित राहत असल्याचं
सरकारच्या निर्दशनास आलं.
त्यामुळे मग अधिकाधिक शेतकऱ्यांना
केसीसी उपलब्ध करून देण्याकरता सरकारनं फेब्रुवारी 2020मध्ये
पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या सगळ्या लाभार्थ्यांचा केसीसी योजनेत समावेश
करण्याची मोहीम हाती घेतली.
या मोहिमेचा भाग म्हणून सरकारनं
पीएम-किसान योजनेच्या वेबसाईटवरच किसान क्रेडिट कार्डसाठीचा अर्ज उपलब्ध करून
दिला.
किसान क्रेडिट
कार्डसाठी ऑनलाईन पद्धतीनंअर्ज करता येतो.
ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा असल्यास
ही फॅसिलिटी फक्त CSC (Common
Service Centre) किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर
उपलब्ध आहे. वैयक्तिकरित्या शेतकरी किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करू
शकत नाही. त्यासाठी त्यांना CSC किंवा आपले सरकार सेवा केंद्रावरच
जावं लागतं. तिथं जाऊन क्रेडिट कार्डसाठीचा फॉर्म भरावा लागतो. पण, हे
करत असताना शेतकऱ्यांकडून एक ठरावीक शुल्क आकारलं जातं.
आता पाहूया किसान क्रेडिट कार्ड
अंतर्गत किती क्रेडिट लोन शेतकऱ्यांना दिलं जातं ते.
कर्ज किती आणि
उपयोग काय?
केसीसी अंतर्गत एखाद्या शेतकऱ्याला
किती कर्ज द्यायचं, हे त्या शेतकऱ्याचं उत्पन्न किती आहे, त्याच्याकडे
जमीन किती आहे आणि त्या जमिनीवर लागवडीखालील क्षेत्र किती आहे, यावरून
ठरवलं जातं.
केसीसी अंतर्गत शेतकऱ्याला 3 लाख
रुपयांपर्यंत कर्ज दिलं जातं. इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे 1 लाख
60 हजार रुपयांपर्यंत विनातारण कर्ज दिलं जातं, तर
त्यापेक्षा अधिक पण 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी तारण ठेवणं
गरजेचं असतं.
केसीसीवरून जे काही कर्ज दिलं जातं
त्यावर 7 टक्के व्याजदर आकारला जातो. पण, शेतकरी
कर्जाची परतफेड वर्षभरात करणार असेल, तर व्याजदरात 3 टक्के
सवलत दिली जाते. म्हणजे एकूण 4 टक्के व्याजदारानं शेतकऱ्यांना कर्ज
मिळतं. शेतमालाच्या विक्रीतून शेतकऱ्यांनी या कर्जाची परतफेड करणं अपेक्षित असतं.
यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे
1 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज बिनव्याजी दिलं
जातं.
याशिवाय, किसान
क्रेडिट कार्ड अंतर्गत लोन घेणाऱ्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला किंवा अपंगत्व
आलं, तर त्याला 50 हजार
रुपयांचं विमा संरक्षण दिलं जातं, तसंच इतर धोक्यांसाठी 25 हजार
रुपयांचं विमा संरक्षण दिलं जातं.
किसान क्रेडीट कार्ड ऑनलाईन अप्लाय करणे के लिये आज हि
संपर्क करे
श्री कंम्प्युटर एज्युकेशन गडीसुर्ला
चंद्रशेखर देशमुख यांचे घरी गडीसुर्ला
मो. नं. 9067754259
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.